सफर हरिहर गड - अंजनेरी - रामसेज ची भाग - २
भाग -१ बरीच पायपीट झाल्याने भुकेने सार्वजन व्याकूळ झालेले. अन् जेवणाचा मेन्यु पण भन्नाट होता चपाती, टोमाटोची व बटाट्याची भाजी, शेंगदाण्याची चटणी, पापड, लोणचे व महाभयंकर असा हिरव्या मिर्चीचा ठेचा बस् !!!!! भुकेचा तडाखा एवढा मोठा होता कि, अर्धे पोट भरल्यावर सर्वांच्या संवेदना जाग्या झाल्या व ठेच्याची जहालता जाणवली. हाsss हुssss श्श्शssss हुश्यss अशा उद्गारांनी गाझाब माजवला. डोळे तोंड नाक पाणीदार झालेले ;) त्या धुमश्चक्रीत ठेच्याची झळ बसलेल्यान्साठी दोन ओळी - भाजी एवढा ठेचा कधीच खायचा नसतो बिघडलेल्या सिस्टीम चा दोष वाढणाऱ्यावर लादायचा नसतो !! हालचाली मंदावल्या होत्यच. घासांची वारांवारिताही न्यूनतम पातळीवर स्थिरावली होती, इतक्यात राजू सर दत्त म्हणून उभे राहिले अन् तब्बल अडीच किलो पेढे बाहेर काढले व वाटप सुरु केले. ठेच्याच्या आगीवर पेढ्याची फुंकर मनाला दिलासा देणारीच ठरली राजू सरांचे पेढ्या पेक्षा गोड शब्दात कौतुक करून तो रसभरीत भरगच्च कार्यक